शिवीगाळ केला म्हणून शेतकऱ्यांच्या अंगावर चढवली कार आणि शेतकऱ्याचा केला खून

 

गडचिरोली सुपर फास्ट न्युज वृत्तसेवा 
जि. अहिल्यानगर
 शिवीगाळ
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार
: केल्याची पोलिसांत तक्रार केला म्हणून.रावसाहेब गागरे तक्रार देण्यासाठी मुलासह

निघालेल्या शेतकऱ्याला

कारखाली चिरडून त्याचा खून करण्यात आला. ही घटना गुरुवारी सायंकाळी कोपरगाव तालुक्यातील धोत्रे शिवारात घडली. याप्रकरणी रात्री दोन वाजता कोपरगाव ग्रामीण पोलिस  

ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रावसाहेब पुंजाबा गागरे (वय ५५) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.

गागरे व प्रशांत गागरे हे अमोल

गुरुवारी सायंकाळी शेतीची कामे आटोपून रावसाहेब, त्यांचा मुलगा प्रवीण व प्रशांत गागरे हे ट्रॅक्टरमधून घरी जात होते. त्यावेळी रस्त्यात अमोल बळीराम शिंदे (रा. धोत्रे, ता. कोपरगाव) हा त्याच्या मित्रांसोबत रस्त्यावर दारू पीत बसला होता. ट्रक्टरला वाट देण्यावरून वाद झाल्याने थोड्या वेळाने अमोल शिंदे याने रावसाहेब गागरे यांना फोनवरून शिवीगाळ केली. पळून

 रावसाहेब गागरे, प्रवीण


शिंदेविरुद्ध पोलिसांत तक्रार करण्यासाठी रात्री आठच्या सुमारास मोटारसायकलवरून कोपरगावकडे निघाले. तेव्हा धोत्रे ते खोपडी रस्त्यावर अमोल बळीराम शिंदे याने कारने (क्रमांक एमएच-१७, सीएच- ९९१९) गागरे यांच्या दुचाकीला पाठीमागून धडक दिली. धडकेमुळे तिघेही खाली पडले, तेव्हा अमोल शिंदे याने रावसाहेब गागरे यांच्या अंगावरून दोन-तीन वेळेस कार मागेपुढे करून रावसाहेब यांचा खून केला. यात प्रवीण व प्रशांत हेही जखमी झाले. घटनेनंतर अमोल शिंदे गेला.
डिस्चार्ज मिळताच आरोपीला अटक होणार
आरोपी अमोल शिंदे हा वैजापूर येथील खासगी रुग्णालयात दाखल झाल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिस निरीक्षक संदीप कोळी व पोलिस पथक वैजापूरला गेले. शिंदे याच्याही डोक्यास मार लागल्याने त्यास पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयामध्ये हलविण्यात आले आहे. तेथे योग्य पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, डिस्चार्ज मिळताच त्याला अटक करण्यात येईल, अशी
माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाली आहे.

0/Post a Comment/Comments