सुपर फास्ट न्युज वृत्तसेवा
मुनिश्वर बोरकर
संपादक
- गडचिरोली - संपूर्ण राज्यातील एस.टी महामंडळ कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या महाराष्ट्र शासन अजुनपर्यंत सोडविल्या नसल्यामुळे ऐन सनासुदीच्या दिवसा पासून एस.टी कर्मचाऱ्यांनी आपला बेमुदत संप पुकारला आहे . त्यामुळे प्रवासाचे हाल होतांना दिसत आहेत . शासकीय कर्मचाऱ्या प्रमाणे वेतनवाढ नाही. २०१८ पासुन महागाई भत्याची थकबाकी , घरभाडे भत्ताची थकबाकी , वार्षीक वेतनवाढ व इतर मागण्या शासन दरबारी रेटून सुद्धा शासन एस.टी कर्मचाऱ्यांना लालीपाप देत आहे. मुख्यमंत्री स्तरावर अनेक बैठका हो वुनही तोडगा निघाला नाही त्यामुळे दि. 3 संष्टेबर पासून एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यानी धरणे
आंदोलन करीत आहेत. एस.टी कर्मचारी संपावर गेल्यामुळे मोजक्याच बसेस सुटत आहेत . ऐन पोळ्याच्या सनाला संपाचे हत्यार सुरु झाले जर का संप पुढे असाच चालला तर गणपती सिझनमधे संप सुरच राहण्याचे चिन्ह दिसत असल्यामुळे चाकरमाने ची पंचायत होणार आहे.
Post a Comment